शाश्वत विकास आणि सुरक्षेसाठी तंत्रज्ञान अनिवार्य : कुलगुरू डॉ. काळे* डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद सुरू

Spread the news

*शाश्वत विकास आणि सुरक्षेसाठी तंत्रज्ञान अनिवार्य : कुलगुरू डॉ. काळे*
डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद सुरू

 

 

  •  

कोल्हापूर: ‘ शाश्वत विकास आणि सुरक्षेसाठी तंत्रज्ञान अनिवार्य असून , तंत्रज्ञानाच्या विकासासाठी परिषद यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नवसंशोधकांनी निरीक्षण , श्रवण, लेखन आणि अभ्यास वृद्धिंगत करून कौशल्यपूर्ण व्हावे आणि समाज सक्षम करावा ‘ असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे(लोणेरे) कुलगुरू प्रा. डॉ. कारभारी काळे यांनी केले. डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (पुणे सेक्शन, मुंबई सेक्शन) ,कॉम्प्युटर सोसायटी ऑफ पुणे त्यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ब्लॉकचेन डिस्ट्रीब्यूटेड सिस्टिम्स ॲन्ड सिक्युरिटी ‘ या तीनदिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अशा प्रकारची दक्षिण महाराष्ट्रातील पहिलीच परिषद आहे. सात देशातील तब्बल 1089 संशोधकांचे शोधनिबंध परिषदेसाठी प्राप्त झाले आहेत.

डॉ. काळे पुढे म्हणाले, ” जिओ स्पेशल सेन्सर आणि क्वांटम टेक्नॉलॉजीमुळे डिजिटलायझेशन आणि सुरक्षेचे नवीन युग सुरू झाले आहे. क्वांटम कि डिस्ट्रिबूशन तंत्रज्ञानामुळे सुरक्षित संवादप्रणाली निर्माण होत आहे “. अत्याधुनिक वैज्ञानिक बदलांची माहिती देताना त्यांनी विविध समस्यांवरील तांत्रिक उपायांची चर्चा केली. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे प्रास्ताविकामध्ये म्हणाले, “ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने डिजिटल नव्याने व्याख्या केली आहे. डिस्ट्रीब्यूटेड सिस्टिममुळे पारदर्शकता आणि विश्वास यांच्या बाबतीत तोडजोड होऊ नये, यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे. सहकार्यातून संशोधन, विचारांचे आदान प्रदान, कटिंग- एज रिसर्च यांसाठी या कॉन्फरन्समुळे प्लॅटफॉर्म मिळाला आहे.” डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे (पुणे विद्यापीठ)कुलगुरू आणि आयईईई कॉम्प्युटर सोसायटी पुणे चॅप्टरचे चेअरमन डॉ. राजेश इंगळे यांनी आंतरराष्ट्रीय परिषदांची प्रासंगिकता, आवश्यकता, संशोधनातील संवाद, प्रशिक्षण यावर विस्तृत भाष्य केले. निवडक संशोधनप्रबंधांच्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. विविध तांत्रिक विषयांवर तज्ञांची व्याख्याने यावेळी झाली.

आयईईई पुणे चॅप्टरचे चेअरमन डॉ. अमर बुचडे म्हणाले, ” ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमुळे आरोग्य, कायदा,शिक्षण, औषधनिर्माण अशा सर्व क्षेत्रात डाटा सुरक्षित ठेवणे शक्य झाले आहे “. डॉ. विनित कोटक यांनी संशोधन क्षेत्रातील व्यासंग आणि सामाजिक विकास यांच्यातील सहसंबंधावर प्रकाश टाकला. पॅनल चर्चेमधून परिषदेच्या मुख्य विषयावर विचारमंथन झाले.

परिषदेचे अध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, ” ज्ञान आणि कृती यांची सांगड आवश्यक असून अभ्यासकांचे चिंतन समाजाला चालना देते. तंत्रज्ञानातून विश्वशांती या उद्देशासाठी संशोधकांनी कृतिशील रहावे ‘.

जपान सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागातील शास्त्रज्ञ डॉ. वैभव मेहता, ऑस्ट्रेलियातील पर्थ विद्यापीठातील संशोधक डॉ. विद्यासागर पोतदार , संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, विविध इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, संशोधक, पदाधिकारी, विद्यार्थी, यावेळी उपस्थित होते. इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी आभार मानले


Spread the news

You may also like

error: Content is protected !!