विवेकानंद कॉलेजचा विज्ञान शाखेचा डालमेट कित फ्रान्सिस 98.33 गुण संपादून सर्वात अव्वलस्थानी
- वाणिज्य्ा व कला शाखेतही अव्वलस्थानी राहण्याची यशस्वी परंपरा कायम
कोल्हापूर दि. 5 : 1987 पासून बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालात कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजने विज्ञान, वाणिज्य् आणि कला शाखेत अव्वलस्थानी राहण्याचा सन्मान 2025 च्या बारावी बोर्ड परीक्षेतही कायम ठेवला आहे. यावर्षी विज्ञान शाखेत कु. डालमेट कित फ्रान्सिस 98.33 % प्रथम क्रमांक संपादन करुन अव्वलस्थानी राहिला. कु.जाधव माधुरी प्रविण 93.67 टक्के गुण संपादन करीत दुसरी आली. कु.शर्मा साक्षी रविराज व कु.मगदूम द्रुती अरुणकुमार 93.00 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच वाणिज्य शाखेत कु. कित्तूर रेहान सैफ 96.33 टक्के गुण संपादन करुन प्रथम आला. कु. कुलकर्णी नंदना अमित 95.33 गुण मिळवून व्दितीय आली. तृतीय क्रमांक कु.दामुगडे स्वरा प्रशांत 94.83 गुण मिळवून विवेकानंद कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा यशस्वी झेंडा फडकाविला.
विवेकानंद शिक्षण संस्थेची विद्यासमिती आणि विवेकानंद कॉलेजने राबविलेल्या विशेष स्कॉलर बॅचच्या प्रयत्नामुळे यावर्षीही विवेकानंद कॉलेजने सर्वात अव्वलस्थानी राहण्याची परंपरा कायम ठेवली असून विज्ञान, वाणिज्य् आणि कला शाखेतील आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. असे मत विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विज्ञान स्कॉलर बॅच प्रमुख प्रा सौ.एस.पी.पाटील, प्रा एस.एन.साळुंखे, वाणिज्य् स्कॉलर बॅच प्रमुख प्रा सौ एस पी वेदांते, कला विभाग स्कॉलर बॅच प्रमुख प्रा सौ एम पी गवळी, प्रा के जे गुजर, प्रा.एस.टी.शिंदे, प्रा विश्वंभर कुलकर्णी, कला वाणिज्य् विभागप्रमुख प्रा सौ शिल्पा भोसले, विज्ञान विभागप्रमुख प्रा एम आर नवले इ.गुरुदेव प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.