सौ अरुंधती धनंजय महाडिक यांनी 23 जुलै 2009 रोजी स्थापन केलेल्या भागीरथी महिला संस्थेच्या रोपट्याचे आता 2026 मध्ये वटवृक्षात रूपांतर झालेले आहे लाखो महिला सक्षम व आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या पायावर उभे आहेत महिलांना अनेक प्रकारची प्रशिक्षणे शिबिरे घेऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागा करण्याचे काम संस्थेने केलेले आहे तसेच अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये कळी उमलताना हा कार्यक्रम घेऊन तसेच स्वसंरक्षणाचे धडे देऊन त्यांच्या उन्नती मध्ये योगदान देण्याचे काम संस्थेने केले आहे उत्तम आरोग्य सदृढ आरोग्य या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करून संस्थेने खारीचा वाटा उचललेला आहे तसेच महिलांच्या पाककलेला प्रोत्साहन देऊन भीमा कृषी प्रदर्शनामध्ये तसेच कोल्हापूर जिल्ह्याबाहेर पुणे येथील भीमथडी जत्रेच्या प्रदर्शनामध्ये स्वखर्चाने स्टॉल देण्याचे कार्य संस्थेने केले आहे शेळीपालन योजनेच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम दिले गोरगरीब व वंचितांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था अशा या संस्थेच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🙏🙏🙏💐💐💐👍👍👌




