*नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया*
*भावपूर्ण श्रद्धांजली..!*
डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (डॉ. डी. वाय. पाटील) यांच्या दुःखद निधनाने शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण क्षेत्रातील एक युगपुरुष हरपला आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रासह देशभरात अनेक शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांची उभारणी करून ज्ञान, शिक्षण आणि आरोग्यसेवेची दारे लाखो विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी खुली केली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, रोजगार आणि समाजसेवेच्या संधी उपलब्ध झाल्या.
शैक्षणिक, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री या प्रतिष्ठित नागरी सन्मानाने गौरविले. अभ्यासू, दूरदर्शी, कर्तृत्ववान आणि समाजहिताची अखंड जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात अमूल्य योगदान दिले. त्यांनी उभारलेल्या संस्था आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि पाटील कुटुंबीयांना तसेच त्यांच्या असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ॐ शांती!
#DYPatil




