Spread the news

राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप शिवसेना व जनसुराज्य शिवाय अन्य कोणी छुपे मित्र पक्ष आहेत का?

­

 

गोकुळचे संचालक युवराज पाटील व केडीडीसीचे संचालक भैया माने यांनी जाहीर करावे.

  •  

भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांची मागणी

कोल्हापूर दिनांक 21.
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नामदार हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची संयुक्त पॅनल बनवावे अशी मागणी केडीसीसी चे संचालक भैया माने व गोकुळचे स्वीकृत संचालक युवराज बापू पाटील यांनी केलेचे पत्रक वाचण्यात आले .
पण भाजप शिवसेना जनसुराज्य यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य कोणी मित्र पक्ष आहेत का ? हे माननीय युवराज बापू व माननीय भैया माने यांनी जाहीर करावे अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केली आहे.
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुक ही वेगळ्या वळणावर गेली आहे. ११०८ दूध संस्थांचा अवसायनाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे या संस्थांच्या वतीने मी स्वतः माझ्या मंजुनाथ सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये या संस्थांना मताचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी न्यायालयात गेलो आहे. अजून या ११०८ दूध संस्थांच्या सभासदत्वाचा व मताचा अधिकाराचा प्रश्न प्रलंबित असताना या लोकांना या निवडणुकीची घाई का लागली हा प्रश्न या निमित्ताने अधोरेखित होतो कारण या ११०८ दुध संस्था या मताला पात्र होणे अत्यंत आवश्यक आहे .
भारतीय जनता पार्टीचे नेते व महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील हे भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्याशी चर्चा करत महायुतीतील नेत्यांच्या मधील बेबनाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत अशाप्रसंगी श्री भैय्या माने व श्री युवराज बापू पाटील यांनी या पद्धतीने पत्र प्रसिद्ध करून या बेबनावाला पुन्हा खतपाणी घालण्याचे काम करू नये असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले आहे.
मुळात श्री भैय्या माने व श्री युवराज बापू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य मित्र पक्षांना सोबत घेऊन स्वतंत्र पॅनेल करून निवडणूक लढवण्याची परवानगी मुख्यमंत्री कडून घ्यावी अशी मागणी करत आहे पण अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप , शिवसेना (एकनाथ शिंदे गट ) व जनसुराज्य हे मित्रपक्ष सोडून अन्य कोणी छुपे मित्र पक्ष आहेत का याचा खुलासा करणे आवश्यक आहे.
गोकुळ दूध संघात महायुतीची सत्ता यावी अशी इच्छा कोल्हापूर जिल्ह्यातल्या महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचे नेत्याचे असताना सुद्धा श्री युवराज बापू पाटील व व श्री भैय्या माने यांनी असे पत्रक प्रसिद्ध करणे म्हणजे पुन्हा महायुतीतील बेबनावाला खतपाणी घालण्यासारखेच प्रकार आहेत. त्यामुळे भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझी या दोघांना विनंती आहे की अशा पद्धतीने पत्रक बाजी करुन पुन्हा महायुतीत बेबनाव होईल असे कृत्य करू नये.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!